*जगायचं कुणासाठी.*
❓🤔🙆🏻♂️❓🤔🙆🏻♂️
*( अंतर्मुख करणारा लेख,वाचाच )*
*माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो.पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो.पण..*
*आयुष्य का जगतो ❓🤔*
*कशासाठी जगतो ❓🤔*
*आणि कुणासाठी जगतो ❓🤔*
*याची मात्र काहीच कल्पना नसते.पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर मरमर करतो,काबाडकष्ट करतो,नको,नको त्या मार्गाने पैसा कमावतो.पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो,* *लहान-सहान कामे करतो,अंग मेहनतिचीही कामे करतो.पूर्वी 80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात 😥😰 आणि विसरून जातात.* *मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त 10/15 दिवसांपुरतीच असते...कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच.मी,माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं..*
*सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य वाचावा,व शेअर मात्र नक्कीच करावा.*
*🙏🏻धन्यवाद !🙏🏻*
*मग...जगावं तरी कुणासाठी.*
❓🤔🙆🏻♂️❓🤔🙆🏻♂️
*तर...जगावं तर ते समाजासाठी...तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता ❓🤔*
*तुम्ही काय उभारता ❓🤔*
*तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का ❓🤔 यालाच तुमच करियर म्हणतात.तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात...* *करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा...समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...*
*खूप पैसा,गाडी, बंगला,दागदागिने,इस्टेट.आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो.पैसा, गाडी,बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म,तुमच्या प्रति, असलेली समाजाची आपुलकी,आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*.
*आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही...पण समाजासाठी झटणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत.* *कारण ते जगले होते समाजासाठी.त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत.उदाहरण घ्यायचच झालं तर संत गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे...फक्त हातात एक खराटा,डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा... पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं.*
*गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं.पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची.याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*
*म्हणजे फक्त पैसा,इस्टेट कमावूनच माणूस मोठा होतो,अजरामर होतो हे त्यांनी खोटं ठरवलं.*
*पैसा,इस्टेट न कमवताही फक्त निस्वार्थ सेवा,समाज प्रबोधन करून पण ते अजरामर झाले.*
*आणि दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर,जगद गुरू संत तुकाराम महाराज यांचेही देता येईल,त्यांच्याकडे तर खूप काही होते,पण त्यांनी ते लोकांना वाटून,स्वतः मात्र जनसेवेसाठी वाहून घेतले.प्रबोधन केले.समाज परिवर्तन घडवून आणले.त्यांनी जर वडिलोपार्जित इस्टेटीत जर पुढे पुन्हा वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःला त्यात गुंतवून घेतले असते,तेही फक्त पैसा,पैसा करत राहिले असते,तर आज आपल्या समोर आदर्श,जगत गुरू म्हणून संत तुकाराम महारांचे चित्र उभे नसते राहिले,ते तुकाराम कधीचेच नामसेस झाले असते.आज कुणीही त्यांना आठवणीत ठेवले नसते.*
*टीप:-म्हणून तुम्हीही पैसा कमवू नका,पैसा,इस्टेट,असेल तर ती लोकांना वाटून टाका असेही मी म्हणणार नाही.*
*फक्त त्यांच्या सारखे,आपणही समाजात असं काही करतो का ❓🤔 समाजाला काही देतो का ❓🤔*
*भले नसेल आपली महती साधु-संतां-एवढी कि,लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील.पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने,*
*एकमेकांचा राग,द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.*
*ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण,ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...*
*बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही.बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात.ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील...या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी ❓🤔....*
*स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगताजगता,थोडे जसमाजासाठीही जगा...*
*दान-धर्म करा,योग प्राणायम करा,ध्यान धारणा करा,भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या.येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे...*
